श्रीरामपूर : पालिका निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे. तशी तशी प्रभागातील उमेदवारीवर दावे, आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजून निवडणूक जरी लांबलेली असली तरी, प्रत्येक्ष – अप्रत्येक्ष रित्या सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून. पालिकेच्या सध्या निर्माण करण्यात आलेल्या, प्रभाग ११ मधील उमेदवरीवरून चांगलीच रंगली आहे. ज्यात “लायकी नसतांना भी नगरसेवक केलं भाई नी ” अशी पोस्ट माजी उपनगराध्यक्ष पिता व दाजी असलेल्या युवा कार्यकर्त्याने सोशल मिडियावर टाकल्याने. या पोस्ट ला प्रतिउत्तर देत माजी नगरसेवक पुत्राने “माझ्या मागे पुर्ण समाज आहे… तुझ्या मागे २ कुत्रे तरी आहेत का? ” अशी पोस्ट टाकल्याने, नेमकी कोणा मागे कोण आहे, आणि कोणामुळे कोण नगरसेवक झालं अशी चर्चा वार्ड नंबर २ मधील चौका चौकात रंगली आहे.
सोशल मिडिया सुरू असलेला राजकीय अस्तित्वाचा वाद, हा जनतेसाठी आहे, की केवळ चर्चेत येण्यासाठी पब्लिसिटी स्टेंट. हे आगामी निवडणुकीत पाहिला मिळेलच. नाही तर जे आज एका मेकांवर आरोप करत आहेत. तेच एकत्र आणण्यासाठी, वार्ड नंबर २ मधील मोठ्या राजकीय नेत्यास, तगडी राजकीय सेटलमेंट करवी लागेल हे मात्र तितकेच खरे.