श्रीरामपूर – कांदा मार्केट परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर व्यापारी व शेतकऱ्यांचे चिखला मुळे मोठ्या प्रमाणावर हाल होत आसल्याने लवकरच या परिसरात काँक्रिटीकरण करावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ शुभांगी शेटे यांनी मार्केट कमिटी सचिव यांच्याकडे ऐका पत्रकाद्वारे केली आहे. मार्केट कमिटि परिसरात व्यापाराचा मालाच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर येत आसतात तसेच शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर शेतमाल घेऊन येतो या सर्वानाच मोठी कसरत रोज करावी लागते, तसेच पावसाळ्यात तर पायी चालणे देखील मुश्किल होऊन बसते त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
श्रीरामपूर मार्केट कमिटी मध्ये अनेक कामे सुरू आहेत परंतु मार्केट मधील काँक्रिट करण चे काम कोणताही संचालक व्हावे म्हणून प्रयत्न करत नाही परंतु व्यापा-याच्या व शेतकऱ्यांच्या सोयी साठी शिवसेना महिला आघाडी कामे होण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन देखील करेल त्यामुळे आपण लवकरात लवकर मार्केट कमिटि आतील परिसर स्वच्छ करून काँक्रिटीकरण करून व्यापारी व शेतकऱ्यांचे हाल थांबवावे अन्यथा शिवसेना स्टाईल ने आदोलन करावे लागेल असा ईशारा शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ शुभांगी शेटे यांनी मार्केट कमिटिला दिला आहे.